
तिरूमला-वृत्तसंस्था | असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या तिरूमला येथील श्री बालाजी मंदिरात आज पंतप्रधान मोदीजी यांनी भेट देऊन भगवान श्री बालाजींचे दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील तिरुमला मंदिराला भेट दिली. येथे भगवान व्यंकटेश्वराच्या विशेष पूजेत त्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधानांनी तिरुपती मंदिराची त्यांची छायाचित्रे पोस्ट केली यात त्यांनी – ’तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात १४० कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.’ असे नमूद केले.
दरम्यान, सध्या तेलंगणा दौर्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज कॉंग्रेस आणि केसीआर यांच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. पीएम म्हणाले की तेलंगणातील लोक केसीआर सरकार उलथून टाकण्याच्या तयारीत आहेत. आता तेलंगणात भाजपचे आगमन निश्चित असल्याचे मोदी म्हणाले.
आज आयोजीत सभेत पीएम मोदी म्हणाले की, तेलंगणातील जनता केसीआर सरकार पाडण्यासाठी तयार आहे. तेलंगणात कॉंग्रेसबाबतही काही लोक संभ्रम पसरवत आहेत. पण सत्य हे आहे की तेलंगणाचा सत्यानाश करण्यात कॉंग्रेस आणि केसीआर हे तितकेच पापी आहेत. त्यामुळे तेलंगणातील लोक एक रोग दूर करून दुसर्याला आमंत्रीत करणार नाहीत. ते पुृढे म्हणाले की, बीआरएस आणि कॉंग्रेसने नेहमीच एससी आणि एसटीचा विश्वासघात केला आहे. भारतीय जनता पक्षच खर्या अर्थाने सामाजिक न्याय मिळवून देत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कॉंग्रेस आणि केसीआर हे दोघेही तेलंगणाचा नाश करण्यासाठी तितकेच दोषी आहेत. तेलंगणात पहिल्यांदाच आमच्याकडे मागासवर्गीय मुख्यमंत्री असेल असे अश्वासन देत असल्याची ग्वाही देखील नरेंद्रजी मोदी यांनी दिली.
Leave a Reply