नाकारले गेलेल्यांकडून संसदेत गोंधळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली : देशातील जनतेकडूननाकारले गेलेले विरोधक स्वत:च्या राजकीय लाभासाठी हुल्लडबाजी करून संसदेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा आणण्याच्या प्रवृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधकांना आधीच खडेबोल सुनावले.

दोन्ही राज्यांमध्ये भाजप आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले. लोकांनी विरोधकांना नाकारले आहे. त्यामुळे लोकांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्तीसाठी विरोधकांनी कष्ट करण्याची गरज आहे. संसदेमध्येही महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे, त्यासाठी विरोधकांनीही चर्चेत सहभागी झाले पाहिजे, असे मोदी म्हणाले. विरोधकांमधील काही सदस्यांची वर्तणूक योग्य असून कामकाज सुरळीतपणे झाले पाहिजे असे त्यांनाही वाटते. संसदेमध्ये नव्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. जुन्या सदस्यांनी नव्या पिढीला घडवले पाहिजे, त्यांच्याकडे नव्या कल्पना असू शकतात म्हणूनच त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, असा सल्ला मोदींनी विरोधकांना दिला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*