
नागपूर-प्रतिनिधी | माजी मंत्री नवाब मलीक यांना सोबत घेऊ नका अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली असून या संदर्भात त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहले आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार गटात जाऊन सत्ताधारी बाकावर बसले. विधिमंडळात यावरून वादळ उठले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून, नवाब मलिक यांना आपल्या पक्षात घेऊ नका, असे म्हटले आहे.
सत्ता येते जाते, पण देश महत्त्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये, असे ङ्गडणवीस यांनी म्हटले. विधानसभा सदस्य म्हणून सभागृहात येणे मलिक यांचा अधिकार आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे स्वागत जरूर करावे. मात्र, अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, योग्यहोणार नाही, असे आमचे स्पष्ट मत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, या पत्रात पुढे नमूद केले आहे की, आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षालाकरावा लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंधअसल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी, त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणार्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी आशा देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
Leave a Reply