
मुंबई-प्रतिनिधी । ”राज्य सरकार 31 डिंसेबरला पडणार” या आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. थोड्याच दिवसात आदित्य ठाकरेंसह संजय राऊत तुरुंगात असतील, असा वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे.
नारायण राणे म्हणाले की, ही काय जादूची कांडी आहे का? स्वत:चे जे होते ते सांभाळता आले नाहीत. एकनाथ शिंदे दिवसाढवळ्या त्यांना घेऊन गेले. जे जाहीर सभा घेऊ शकत नाहीत, ते आता खळा बैठका घेत आहेत. अशी शिवसेनेची स्थिती आहे. थोड्या दिवसांनी आदित्य ठाकरे या बैठकांनाही नसेल, तो सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात तुरुंगात असेल. संजय राऊतही तुरुंगात जातील. मी त्यांच्यावर बोलायचे टाळतो. कारण बावळट माणसांवर बोलायला मला आवडत नाही.
आदित्य ठाकरे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अनेकदा राज्य सरकार पडणार असल्याचे बोलत आहेत. पण तो बोलून सरकार पडणार आहे का? त्यांचे 16 आमदार आहेत. निवडणुकीत पाचही निवडून येणार नाही. ही त्यांच्या पक्ष्याची स्थिती आहे. असे असताना आमचे सरकार कसे काय पडणार? अपात्रतेचा निर्णय दोन्ही बाजुंचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही बाजूंचे लोक त्यात आहेत. त्यामुळे सरकार पडेल असे वाटत नाही. शिवाय राखीव म्हणून आमच्याकडे अजित पवारही आहेत, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे.
Leave a Reply