अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्गला सुनावले !

नवी दिल्ली- वृत्तसेवा । भारतीय लोकसभा निवडणुकीबाबत मुक्ताफळे उधळण्याऱ्या मार्क झुकरबर्ग याला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोरदार सुनावर प्रत्युतर दिले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयावर मार्क झुकरबर्ग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिले आहे. मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतासह अनेक देशांतील सध्याच्या सरकारांच्या निवडणूक पराभवाबाबत वक्तव्य केले होते. त्यावर वैष्णव यांनी त्यांच्या विधानाला चुकीचे” ठरवले आहे.

अश्विनी वैष्णव यांचा पलटवार

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्ग यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, त्यांना समाजमाध्यमांवर खोट्या माहितीचा स्रोत होण्याचे टाळण्याचा सल्ला दिला. त्यांनी X (माजी ट्विटर) हँडलवर ट्विट करत झुकरबर्ग यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

वैष्णव यांनी लिहिले, “जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील 2024 साली झालेल्या निवडणुकीत 64 करोड पेक्षा जास्त मतदारांनि आपला हक्क बजावला. भारतीय जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर पुन्हा विश्वास दाखवला. यामुळे झुकरबर्ग यांचा दावा पूर्णतः तथ्यहीन आहे.” वैष्णव यांनी यासोबतच मोदी सरकारने कोविड काळात केलेल्या प्रयत्नांचे विशेष उल्लेख केले. ते म्हणाले, “800 दशलक्ष लोकांसाठी मोफत अन्नधान्य, 2.2 अब्ज मोफत लसीकरण आणि जागतिक स्तरावर कोविड संकटात दिलेली मदत यामुळे भारताला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका आहे. 2024 च्या निवडणुकीतील निर्णायक तिसऱ्या विजयाने सुशासन व जनतेचा विश्वास सिद्ध केला आहे.”

झुकरबर्ग यांनी काय म्हटले?

मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी जो रॉगन या लोकप्रिय पॉडकास्टरसोबत झालेल्या चर्चेत 2024 च्या निवडणुकांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले,
“2024 हे जगभरातील निवडणुकांसाठी मोठे वर्ष होते. भारतासह अनेक देशांमध्ये निवडणुका झाल्या, आणि बहुतेक ठिकाणी विद्यमान सरकारांचा पराभव झाला. महागाई, कोविडशी संबंधित धोरणे, आर्थिक समस्या – यामुळे जागतिक पातळीवर परिणाम झाला. हे सर्वत्र दिसून आले.”

मोदी सरकारच्या कामगिरीचे समर्थन

अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत मोदी सरकारच्या कोविड काळातील कामगिरीवर विशेष भर दिला. त्यांनी मोदी सरकारने कोविड काळात घेतलेल्या पुढाकारांचा उल्लेख करत, सरकारच्या धोरणांचा समाजावर झालेला सकारात्मक प्रभाव स्पष्ट केला. मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ: 800 दशलक्ष लोकांना कोविड संकटाच्या काळात मोफत अन्न पुरवठा करण्यात आला. सरकारने 2.2 अब्ज लसींचे मोफत वितरण केले गेले, ज्यामुळे भारताने जागतिक स्तरावर कोविड व्यवस्थापनात स्वतःला सिद्ध केले. कोविडनंतरच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आहे.

मेटा प्रमुखांवर आरोप

झुकरबर्ग यांच्या विधानावर वैष्णव यांनी मेटा कंपनीच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी समाजमाध्यमांची जबाबदारी आणि विश्वासार्हतेबद्दल चर्चा करत म्हटले की, “मेटासारख्या व्यासपीठाकडून चुकीची माहिती येणे निराशाजनक आहे. कृपया तथ्य आणि विश्वासार्हता जपण्याचा प्रयत्न करावा.” 640 दशलक्ष मतदारांनी मोदी सरकारला स्पष्ट बहुमत दिल्याचे नमूद करत वैष्णव यांनी झुकरबर्ग यांच्या विधानाची तुलना जनतेच्या निर्णयाशी केली. भारतीय लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सरकारच्या कामगिरीबद्दल त्यांनी कौतुक केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*